
Last Updated on July 4, 2023 by Jyoti Shinde
Mumbai Agra Highway Accident
नाशिक – मुंबई-आग्रा महामार्गावर बुलढाणा येथील समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात 25 जणांचा मृत्यू झाल्यानंतर आता जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. कंटेनरचे ब्रेक फेल झाल्याने भरधाव हॉटेलमध्येच घुसला.आणि त्यात 7 जणांचा जागीच मृत्यू तर 28 जण जखमी.
अपघाताबाबत अधिक माहिती अशी की, धुळे-मुंबई-आग्रा महामार्गावर शिरपूर तालुक्यातील पळासनेर गावाजवळ रस्त्याच्या कडेला असलेल्या हॉटेलवर कंटेनरचा अपघात झाला. या अपघातात 7 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 28 जण जखमी झाले आहेत.Mumbai Agra Highway Accident
मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झाला. दरम्यान, या अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. पोलीस प्रशासन घटनास्थळी पोहोचले असून जखमींना मदत करत आहे.Mumbai Agra Highway Accident