
Last Updated on November 29, 2022 by Jyoti S.
शेतकऱ्याचे मोठे नुकसान
सिन्नर : तालुक्यातील कासारवाडी शिवारात रविवारी (दि. 27) मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने एका पोल्ट्री फार्मची जाळी तोडून आत प्रवेश करीत 200 कोंबड्या ठार केल्या. या घटनेने शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, परिसरातील शेतकरी व नागरिक भयभीत झाले आहेत.
तालुक्यातील भोजापूर खोरे परिसरातील चास,नळवाडी, कासारवाडी, सोनेवाडी शिवारात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा मुक्त संचार वाढल्याने शेतकरी वावर असल्याने नागरिकांना रात्री बिबट्याने पोल्ट्री फार्मची जाळी तोडून आत घराबाहेर पडणे अवघड प्रवेश केला व दिसेल त्या झाले आहे. बिबट्याकडून कोंबड्यांवर हल्ला केला व परिसरातील पाळीव प्राण्यांवर २०० कोंबड्या ठार करून हल्ले होत असल्याचे प्रकार घडत असताना आता बिबट्याने थेट तेथून पळ काढला. देशमुख यांनी सकाळी ग्रामस्थांना याबाबत पोल्ट्रीमध्ये शिरून कोंबड्यांवर हल्ला केला आहे. कासारवाडी येथे वैभव चंद्रकात देशमुख यांचा पाच हजार कोंबड्यांचा पोल्ट्री फार्म आहे. महिनाभरापूर्वीच त्यांनी पोल्ट्रीत कोंबड्या आणल्या होत्या. रविवारी रात्री बिबट्याने पोल्ट्री फार्मची जाळी तोडून आत प्रवेश केला व दिसेल त्या कोंबड्यांवर हल्ला केला व 200 कोंबड्या ठार करून तेथून पळ काढला. देशमुख यांनी सकाळी ग्रामस्थांना याबाबत माहिती देताच माजी उपसरपंच सचिन देशमुख यांनी घटनास्थळी येत पाहणी केली व वनविभागाला याबाबत माहिती दिली.वनविभागाचे आकाश रुपवते.
यांनी घटनास्थळी येत पंचनामा केला आहे. वनविभागाकडून पिंजऱ्याची तरतूद करणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले. यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष नीलेश देशमुख, ग्रामपंचायत सदस्य दत्ता देशमुख, अनिल देशमुख, नंदू देशमुख, शुभम लोहकरे, मोरया मित्र मंडळाचे अध्यक्ष मनोज जगताप, चंद्रकांत देशमुख, सोमा साळुंखे, लवेश साळुंखे आदी उपस्थित होते.
Comments are closed.