Free Ration : राशनकार्ड धारकांना मोफत घरपोच धान्य देण्यासाठी शिंदे फडवणीस सरकारची मोठी भेट

Last Updated on June 21, 2023 by Jyoti Shinde

Free Ration 

थोडं पण महत्वाचं

नाशिक : रायगड जिल्ह्यातील माणगाव या तालुक्यातील लोकांनी खरेदी-विक्री संघाने घरपोच शिधावाटप योजना सुरू केलेली आहे. यामुळे गरीब शिधापत्रिकाधारकांना घरी बसूनच आता रेशनचे धान्य मिळणार आहे. परवानाधारक संस्थेद्वारे घरोघरी रेशन पोहोचवण्याचा राज्यातील हा आतापर्यंतचा पहिलाच प्रयोग यशस्वी ठरलेला आहे. रेशनचे धान्य आणि काळाबाजार असे समीकरण झाले आहे. येत्या काही दिवसांत यासंदर्भात अनेक तक्रारी येत आहेत. मात्र आता या रायगडवासीयांची सुटका करण्यात येत आहे. (Free Ration )

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

या योजनेचा शुभारंभ माणगावच्या प्रांताधिकारी प्राचाली दिघावकर यांच्या उपस्थितीत खंदाड आदिवासीवाडी येथे करण्यात आला. यावेळी खरेदी विक्री संघाचे प्रमुख नीलेश थोरे उपस्थित होते.

या संस्थेची 550 शिधापत्रिकाधारक कुटुंबे आहेत. मंजूर धान्य आता प्रत्येक प्रभागातील कार्डधारकांना देण्यात येणार असून, यामुळे रेशनच्या काळाबाजाराला आळा बसणार आहे. : राज्य सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचे मोठे व महत्त्वाचे निर्णय घेतले जातात. हे निर्णय सर्वसामान्य नागरिकांसाठी फायदेशीर ठरत आहेत. राज्य सरकार नेहमीच मंत्रिमंडळाच्या बैठका घेत असते. या बैठकीत नागरिकांच्या हिताचे निर्णय घेतले जातात. (Free Ration )

हेही वाचा: Ration Card New Update :  या नागरिकांची रेशन कार्ड होणार रद्द, राज्यात एक लाख 27 हजार रेशन कार्ड होणार बंद.खरे कारण घ्या जाणून.

आता राज्य सरकारने शिधापत्रिकाधारकांसाठी मोठा निर्णय घेतला आहे.रेशनकार्ड हे अत्यंत महत्त्वाचे दस्तऐवज आहे. शिधापत्रिकेच्या बातम्या या शिधापत्रिकेद्वारे अनेक गरीब लोकांना मोफत अन्न पुरवले जाते. काही लाभार्थ्यांना स्वस्त दरात धान्य दिले जाते. यामुळे शिधापत्रिका हे महत्त्वाचे शासकीय दस्तऐवज असून, यासोबतच कार्डधारकांना रेशनसाठी येणे बंद होणार आहे. यासोबतच एकही शिधापत्रिकाधारक कुटुंब या धान्यापासून वंचित राहणार नाही.

रेशनच्या बाबतीत नागरिकांना अनेकदा समस्यांना सामोरे जावे लागते, कधी बायोमेट्रिक्सची अडचण येते, बोटांचे ठसे मिळत नाहीत, रेशनचे दुकान घरापासून लांब आहे, मग तिथे पाईप आहे, रिक्षावाल्याला पैसे खर्च करावे लागतात. माणगाव तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष नीलेश थोरे म्हणाले की, त्यांच्या हक्काचे धान्य त्यांच्यापर्यंत पोहोचवणे हा मुख्य उद्देश आहे, तर त्यांना रेशनच्या किमतीएवढेच भाडे द्यावे लागते.

आम्हाला रेशनसाठी बाजारामध्ये जावे लागत होते जे आमच्यासाठी खूप लांब होते आणि ते धान्य आम्हाला रिक्षानेच घरी आणावे लागत होते. पूर्वी पैसे लागायचे, पण आता मात्र ते धान्य घरातच मिळते. लाभार्थी महिला मंगल पवार सांगतात की, आमचे पैसे वाचले असून आम्हाला चांगल्या सुविधा सुद्धा मिळाल्या आहेत.

हेही वाचा: Ration Card Update : रेशनकार्ड धारकांना १ जूनपासून तांदळाच्या जागी हे साहित्य मिळणार.


Comments are closed.